सुशील संस्कारी दहशतवादी
चित्रात वरील भागात अतिशय रानटी आणि हिंस्र लोक आहेत.. ज्यांनी आपल्या दहशती द्वारे संपूर्ण जगास वेठीस धरले आहे. मात्र खालच्या भागात जे लोक आहेत त्यांनी आपल्या देश आणि धर्माला वाच वाचविण्यासाठी शस्त्र हाती घेतले आहे.
वरील चित्रात तर सगळे अडाणी लोक दिसत आहेत. अडाणीपणा त्यांच्या तोंडावरच पसरला आहे. खालच्या चित्रात मात्र शिकले सवरलेले, छान व्यवस्थित पोशाख असलेले लोक आहेत. त्यांच्या तोंडावर कसे शौर्य तेज झळकत आहे. सुदर्शन चानेल चे सर्वेसर्वा सुरेश चव्हाणके तर पाव किलो तूप तोंडावर चोळून आले आहेत. वरच्या फोटोत तुम्हाला महिला नाही दिसणार.. कारण महिलांचे समान स्थान या रानटी लोकांना माहीत. खालच्या फोटोत सुशील संस्कारी महिलांना योग्य स्थान दिले आहे.
वरच्या फोटोतील लोकांच्या अल कायदा, बोको हराम, इसिस, तालिबान, हिजबुल मुजाहिदीन सारख्या क्रूर संघटना स्थापन करून हजारो निष्पाप लोकांचे जीव घेतले.
खालच्या फोटोतील लोकांनी आरएसएस, बजरंग दल, अभिनव भारत, हिंदू युवा वाहिनी सारख्या संघटनाच्या माध्यमातून या पवित्र भारत भूमीत राम राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यासाठी ते बाबरी मशीद, गुजरात दंगल, मालेगाव बॉम्बस्फोट यासारखे विधायक कार्यक्रम हाती घेत आहेत. गोरक्षण च्या नावाखाली लिंचींग करून समाजाला दिशा देण्याचे त्यांचे अपरंपार कष्ठ सुरू आहेत.
आणि त्यांच्या या मेहनतीला दैदिप्यमान यश येत आहे. देशामध्ये मोदी शहा नावाच्या राम लक्ष्मनचे ( बिचाऱ्या लक्षमनाला या अवतारात तडीपारी सारख्या अज्ञात वासाची शिक्षा झाली) राज्य सुरू आहे. ज्यात सर्व जनता सुखी आहे. शेतकरी कामगार वर्ग पोटभर अन्न मिळवत आहेत तर देशातल्या उद्योगपतींचे, गुन्हेगारांचे तसेच देशाच्या शत्रू राष्ट्राच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हिंदू युवा वाहिनीच्या संघटनेचा संस्थापक अजय मोहन बिष्ट ( ज्याला काही लोकं योगी आदित्यनाथ बोलतात) याने तर एका राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राजकारणात अध्यात्म आले की त्याचा फायदा होणारच..तसेही यांनी गोरखपूर हा त्यांचा मतदारसंघ म्लेंच्छ यवनापासुन (मुसलमान लोक) मुक्त घोषित केला असून राहिलेल्या लोकांनी लवकरात लवकर हा मतदार संघ सोडून जाण्यासाठी जाहीरनामा जागो जागी चीटक वले होते. ज्याचा फायदा त्या भागात धार्मिक सलोखा निर्माण होण्यासाठी झाला आहे. ज्याचा राजकीय फायदा त्याला होऊन सलग पाच वेळा खासदारकी आणि आता मुख्यमंत्रीपद मिळन्यामध्ये झाला.
बिष्ट यांच्या राज्यात प्रजा अतिशय आनंदाने नांदत आहे. पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अर्धी जनता जरी स्थलांतर करून जात असली तरी बाकी जनता अतिशय सुखी आहे. जनतेचे आणि पोलिसांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत.. पोलिसांना भ्यायची गरज जनतेला नाही. त्यामुळे गावागावंमध्ये जनता पोलिसांसोबत चोर पोलीस खेळत असते.
चार दिवसांपूर्वी असेच चोर पोलीस खेळता खेळता विकास दुबे कडून चुकून गोळ्या चालवल्या गेल्या.. आणि त्यात फार नाही फक्त आठ पोलीस मारले गेले.. चोर पोलीस च्या या खेळामध्ये नाराज झाल्यामुळे अता विकास दुबे लपाछपी खेळत आहे. विकास दुबे हा बिष्ट यांच्याच पक्षाचा.. त्यामुळे ते पण त्याला सहकार्य करत आहेत. पोलिस प्रशासन जनता आणि लोकनेते यांचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध क्वचित कुठे सापडतील.
वरच्या फोटोतील गावंढळ लोकांना काही नियम नाहीत. कोणत्याही देशात जाऊन आपली कारस्थाने करत असतात. खालच्या फोटोत मात्र काही नैतिक नियम आहेत. देव देश आणि धर्मासाठी जे काही करायचे ते आपल्या देशातच हा त्यांचा अलिखित नियम. त्यामुळेच त्यांचा आदर्श नथुराम गोडसे हा गांधींना गोळ्या घालतो, जिनांना नाही.
वरच्या फोटोतील लोकांना संपूर्ण जगाकडून धूत्करण्यात येतं त्यांना भ्याड समजण्यात येत. खालील फोटोतील लोकांनी देशासाठी केलेलं कार्य काही कमी नाही. जरी अजून सीमेवर कधी गेले नसतील तरी. शेवटी देशात शांतता प्रस्थापित करणे हे देखील कमी नाही ना. त्यांच्या या देशभक्तीवर आणि त्यागमुर्ती प्रज्ञा सिंग वर हेमंत करकरे सारखे देशद्रोही संशय घेत होते.. अजून पण काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. पण मोदींनी तयार केलेल्या नव्या भारतातील जागरूक आणि देशप्रेमी प्रसार माध्यमे त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडतात.
खालच्या फोटोतील सर्व प्रेमळ , अहिंसेच्या पुजारी आणि शांतीचे प्रतीक असलेल्या देशभक्तांना रिच्याचा सलाम. कुणाला हे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्टे वाटत असेल तर तुमच्या दृष्टीचा दोष आहे. त्यांनी पाकिस्तान ला चालते व्हावे. असल्या संस्कार हीन लोकांची देशाला गरज नाही😁😁
आज देेेेशाला संस्कारी दहशत वाद्यांची गरज आहे असे दिसते😁 खर सांगायचे तर
ना रहीम खतरे मे है. ना राम खतरे मे है
दहशतगर्दोसे देश का आवाम खतरे मे है
ना हिंदू खतरे मे है ना मुसलमान खतरे मे हे
धर्मके नुमाईंदोसे हर आम इंसान खतरे मे है.
#richyabhau
Comments
Post a Comment