राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ
राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ १९७१ मध्ये झालेलं भारत पाक युद्ध, यामध्ये अनावश्यक अमेरिकन हस्तक्षेप होऊ लागला. मात्र त्याला न जुमानता पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्यात भारताला यश आलं. यावेळी जाणीव झाली होती की अण्वस्त्रधारी देशांच्या मनमानी दंडुकेशाहीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताला स्वतःला अण्वस्त्रधारी बनावं लागेल. १९६५ तसेच १९७१ मधील युद्धांमध्ये झालेले लागोपाठचे पराभव पाकिस्तान पचवू शकणार नाही आणि पुन्हा मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी परिस्थिती होती. १९६२ मध्ये भारतावर विजय मिळवल्यानंतर चीननं लगेचच १९६४ मध्ये अणुचाचणी करून स्वतःची क्षमता वाढवली होती. या पार्श्वभूमीवर भारत अण्वस्त्रसज्ज होणं अत्यंत गरजेचं होतं. अखेरीस १९७४ मध्ये पोखरणमध्ये चाचणी घेऊन भारतानं अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं. डॉ. राजा रामण्णा हे या चाचणीचे शिल्पकार होते. १९४५ मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि दुसरं जागतिक महायुद्ध थांबलं. या घटनेतून जग आणि सत्तांचे नकाशे बदलले. नवी राष्ट्रं जन्माला आली. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा द...