Posts

Showing posts from January, 2021

जयंत नारळीकर ; गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही ❤️

Image
जयंत नारळीकर ; गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही ❤️ विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना या वर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळणार आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय... कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञान कथामधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा...  विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि सम...

जेनिफर डॉडना आणि जीन्स कापणारी कात्री.

Image
जेनिफर डॉडना आणि जीन्स कापणारी कात्री.  विज्ञानाच्या साह्याने मानवाने एकेकाळी अशक्य वाटतील अश्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून हरितक्रांती शक्य झाली. खर तर यात देखील जनुक तंत्रज्ञानाचा अप्रत्यक्ष वापर केला गेला होता. अधिक रोगप्रतिबंधक क्षमता असलेली, कमी वेळेत आणि खर्चात येणारी गहू, तांदळाची सुधारित वाणं यांचे निर्माण आणि वितरण करण्यात आले. ती केवळ एक सुरुवात होती. पुढील ५० वर्षात जनुकीय अभियांत्रिकी विषयाने खूपच वेग पकडला आहे. आतातर बाजारातून आणलेल्या नवीन जीन्स पँटला जसे अल्टर करतो, त्याच सहजतेने नको असलेली जनुक कापून काढण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. याच तंत्रज्ञानासाठी जेनिफर डॉडना आणि इमॅन्युएल चार्पेंटिअर यांना यावर्षी नोबेल मिळाला आहे.  विसाव्या शतकात केवळ ३० महिला शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. एकविसाव्या शतकात केवळ वीसच वर्षात २७ महिला नोबेल पुरस्कार मिळवू शकल्या.. हे नारीशक्तीचे द्योतक आहे. २०२० मध्ये पहिल्यांदाच विषयात दोन महिला या पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. अर्थात नोबेल मिळणे हा चांगले शास्त...

कमला सोहोनी... पहिली भारतीय शास्त्रज्ञा

Image
कमला सोहोनी...  पहिली भारतीय शास्त्रज्ञा आपल्यापैकी अनेकजण कमला सोहोनी हे नाव आज पहिल्यांदा वाचत असतील... चूक आपली नाहीये..  आपल्या शिक्षण आणि समाजव्यवस्थेची आहे. आयुष्यभर डोंगराएवढं काम करून देखील त्या उपेक्षितच राहिल्या. त्यांना प्रसिद्धीचे वलय फारसे लाभले नाही. संशोधन करायला संधी मिळावी म्हणून सत्याग्रह करणारी ही अवलिया.✊🏾 होय.. महिलांना संशोधन क्षेत्रामध्ये प्रवेश दिला जात नव्हता तेव्हा हिने सत्याग्रह केला होता, तोदेखील नोबेलविजेते शास्त्रज्ञ सीव्ही रामन यांच्याविरुद्ध, परंपरेने घडवलेल्या त्यांच्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध. केवळ प्रवेश मिळवला नाही तर भविष्यकाळात स्वतःला प्रूव्हदेखील करून दाखवले, सीव्ही रामन यांना स्वतःची चूक मान्य करायला लावली❤️ खर तर त्यांची गोष्ट हा नक्कीच एक सिनेमाचा विषय होऊ शकतो.. केवळ गणिताचे जादुई खेळ दाखवणे आणि भविष्याचा धंदा करणाऱ्या शकुंतलादेवीपेक्षा कमला सोहोनी यांचे काम लाखपटीने मोठे आहे, महत्त्वाचे आहे, ज्यातून विज्ञानात मोलाची भर पडली आहे. फ्रान्समध्ये मादाम मेरी क्युरी यांनी सर्वप्रथम संशोधनामध्ये स्त्रीचा ठसा उमटवला.. नंतर लिझ मा...

बार्बरा मॅकक्लिंटॉक : द डायनॅमिक एक्सएक्स

Image
बार्बरा मॅकक्लिंटॉक : द डायनॅमिक एक्सएक्स शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की सर्वात प्रथम डोळ्यापुढे वाहतात न्यूटन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ, डार्विन, सी. वी. रमन, एपीजे अब्दुल कलाम इत्यादी पुरुष शास्त्रज्ञ. मेरी क्युरी किंवा लिझ माईटनर इत्यादी महिला शास्त्रज्ञांचे नाव क्वचित घेतले जाते. केवळ भारतातच नाही तर जगभरात महिलांना ज्ञानाच्या क्षेत्रात दुय्यम समजण्यात आले आहे. आजवरच्या नोबेल विजेत्या ९६२ व्यक्तींपैकी केवळ ५७ महिला आहेत (५.९%). विसाव्या शतकात तर नोबेलने सन्मानित झालेल्या ७४४ व्यक्तीमध्ये केवळ ३० महिला आहेत(४%). जसे आपल्या भारतात प्राचीन काळातील विदुषी महिलांची यादी गार्गी, मैत्रेयी यापुढे सरकत नाही, तसेच चित्र जगभरात पाहायला मिळते. सामान्य व्यक्ती हिपाटिया, मॅडम क्युरी पर्यंत नावे घेतानाच थकतो. असे का.. स्त्रियांकडे बुद्धिमत्ता नसते का.. त्या संशोधन करण्यास अक्षम असतात का??? याचे उत्तर मी द्यायची गरज नाही.. आपल्या सर्वांना माहीत आहे की निसर्गाने असा कोणता भेद नाही केला... भेद केला आहे समाज व्यवस्थेने.. एक्सएक्स गुणसूत्रे घेऊन जन्म घेतला की व्यक्ती केवळ चूल आणि मूल यातच ...